Sunday, March 20, 2016

चौरस समतोल आहार




शरीराची वाढ, विविध कार्ये, शरीराचे आरोग्य, कार्यक्षमता राखण्यासाठी जी विविध प्रकारची पोषकतत्वे लागतात ती आहेत प्रथिने, कार्बोदके, स्निग्धघटक ( तेले), विविध जीवनसत्वे आणि खनिजद्रव्ये.

यातील कोणत्याही एका पोषकतत्वामुळे तुमच्या शरीराची गरज पूर्ण होऊ शकत नाही. शरीराची वाढ होण्यासाठी, शरीरातील अवयवांचे कार्य यातील कोणत्याही एका पोषकतत्वामुळे तुमच्या शरीराची गरज पूर्ण होऊ शकत नाही.
शरीराची वाढ होण्यासाठी, शरीरातील अवयवांचे कार्य होण्यासाठी तसेच शरीर कार्यक्षम राहण्यासाठी यातील प्रत्येक पोषक तत्व महत्वाचे व गरजेचे आहे.

आपल्या भारतीय आहारात मुख्य जेवणाचे ताट भाजीपोळी, भातवरण, चटणी, कोशिंबीर, लोणचे, पापड, दही, ताक, तूप, लोणी, लिंबाची फोड असेच का सजते?
हे सर्व आपण आहारात एकत्रितच घेतो कारण असा आहार चवदार तर आहेच पण मुख्य कारण आहे की, शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी जी विविध पोषकतत्वे शरीराला रोजच्यारोज लागतात ती सर्व एकाच अन्न घटकातून मिळत नाहीत तर ती वेगवेगळ्या अन्नघटकातून एकत्रित घेतल्याने मिळतात. आणि आपल्या पुर्वजांनी या सर्व बाबींचा विचार करूनच असा हा आरोग्यदायी चौरस आहार बनविला आहे.
रोजच्या आहारात जे अन्नप्रकार असतात त्या सर्व अन्नप्रकारामधून कमीजास्त प्रमाणात सर्व पोषकतत्वे मिळतात. यातील काही अन्न प्रकारांमध्ये इतर पोषक तत्वांबरोबर कोणतेतरी एक पोषक तत्व जास्त प्रमाणात असते. उदाहरणार्थ डाळी, मांस, अंडी, मासे इत्यादीमधून जास्त प्रथिने मिळतात.
काही अन्नप्रकारामध्ये कार्बोदकांचे प्रमाण जास्त असते. उदाहरणार्थ वेगेवेगळी धान्ये, भात, बटाटा, रताळी व फळे इत्यादी.
शेंगदाणे, तीळ, जवस इत्यादी तेलबिया व तळलेले अन्नपदार्थ सामोसे, वडे, भजी इत्यादीपासून जास्त स्निग्धघटक मिळतात.
साखरेतून मिळतात फक्त कार्बोदके. तेल, तूप यापासून फक्त स्निग्धघटकच मिळतात. स्निग्धघटक हे फक्त उर्जाच पुरवित असले तरी त्यात विरघळणारी काही जीवनसत्वेही त्यापासून मिळतात.
जीवनसत्वांपासून शरीराला ऊर्जा मिळत नाही पण ती तुमच्या शरीरातील चयापचयाच्या क्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. तसेच प्रथिने, कार्बोदके व स्निग्धघटक यांचा शरीराला व्यवस्थिय उपयोग होण्यासाठी सुध्दा हीच जीवनसत्वे मदत करतात.
कॅल्शियम, फॉस्फरस यासारखी खनिजे तुमच्या शरीराचा सांगाडा मजबूत ठेवण्याचे महत्वाचे काम करतात.
या प्रत्येक पोषकतत्वाचे शरीराला आवश्यक असणारे प्रमाण वेगवेगळे आहे. तसेच जे अन्न तुम्ही खाता त्यातल्या प्रत्येक अन्न प्रकारामध्येही या पोषकतत्वांचे प्रमाण वेगवेगळे आहे.
काही अपवाद वगळता ही पोषकतत्वे तुमच्या शरीरात साठून रहात नाहीत त्यामुळे ती रोजच्या रोज आहारातून घ्यावी लागतात. त्यामुळे ही सर्व पोषक तत्वे ज्या आहारातून तुम्हाला मिळू शकतील असाच आहार असायला हवा. तसेच आहारातून घेतलेल्या सर्व पोषकतत्वांचे प्रमाणही त्यांच्या आवश्यकतेनुसार समतोल असायला हवे.
चौरस समतोल आहाराची हीच कल्पना आहे.

या प्राथमिक पोषकतत्वांच्या समतोल प्रमाणांचा विचार करून भारतीय आहारात भाजीपोळी, भातवरण त्यावर तूप, दही, कोशिंबीर, चटणी, लोणचे,पापड, मीठ आणि लिंबाची फोड असे जेवणाचे ताट आपल्या पुर्वजांनी सजविले आहे.

साभार :- http://knowaboutyourfood.blogspot.in/2007_06_26_archive.html

No comments:

Post a Comment